Wednesday, 1 April 2015

ugc

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समीक्षेसाठी नेमलेल्या हरी गौतम समितीच्या शिफारशींमुळे शिक्षण क्षेत्र पूर्णतः ढवळून निघणार आहे. UGC बरखास्त करा, याशिफारशीसह PHD प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक परीक्षा आणि कुलगुरू पदासाठी दहा वर्षांचा प्राध्यपकीचा अनुभव असावा, अशा सूचानाही समितीने केल्या आहेत. 
विद्यापीठ अनुदान आयोग म्हजेच (UGC) उद्देशपूर्ती करण्यात अपयशी ठरलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात नव्याने उद्भवलेल्या समस्या सोडवण्यासही UGC सक्षम नाही. त्यामुळे पुनर्रचना करण्यापेक्षा UGC बरखास्तच करा, अशी शिफारस गौतम समितीने केली आहे. UGC चे माजी अध्यक्ष हरी गौतम हे या समितीचे अध्यक्ष आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगात कोणताही बदल केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि युजीसी अॅक्टमध्ये सुधारणा करून कोणताही फरक पडणार नाही. त्यापेक्षा विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करा. आणि त्या ऐवजी राष्ट्रीय उच्च शिक्षण प्राधिकरण ( National Higher Education Authority ) या नावाने नवी संस्था स्थापन करावी, असा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाला समितीने सोपवला आहे. 
नवी संस्था स्थापन करण्यात होईपर्यंत UGC मध्ये काही बदल करता येतील. त्यासाठी समितीने काही सूचनाही केल्या आहेत. उदाहरणार्थ पीएचडी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर सामायिक परीक्षा घ्यावी आणि कुलगुरू पदाच्या पात्रतेसाठी किमान दहा वर्षाच्या प्राध्यपकीची अट असावी, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. समितीने केलेल्या शिफारशी आणि सूचना या दूरदृष्टीकोनातून आहेत. त्यामुळे या गंभीरतेने घेतल्या जाताली, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितलं.

Related Posts:

  • JEE Read More
  • क-कल्पनाशक्तीचा क-कल्पनाशक्तीचा पालकांना एकच सांगावसं वाटत की, पुढे जाऊन तुमचं मूल स्वतः कसं आहे यावरच त्याची प्रगती अवलंबून आहे. तुम्ही जितका त्याला स्वत:चा शोध घेऊ द्याल तितकं ते अधिक स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होईल. तेव्हाच ते समाजात उठ… Read More
  • EDUCATION Read More
  • डिजिटल टिपणवहय़ा! व्यावसायिक असो किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, हल्ली प्रत्येकालाच आपल्या दिवसाचं प्लॅिनग करावं लागतं. मीटिंग्सच्या किंवा महत्त्वाच्या कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात, रिमाइंडर्स लावावे लागतात किंवा व्याख्यानांमध्ये टिपणं अर… Read More
  • हे जीवन सुंदर आहे! हे जीवन सुंदर आहे! सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनीच सांगितलेला एक किस्सा. मित्राच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याचा मुलगा अत्रे यांच्याकडे आला. त्या मुलाने वडिलांच्या नावाने लाखोली वाहण्यास सुरुवात केली. का… Read More

0 comments:

Post a Comment